परदेशी शिक्षणाची गरज संपणार!
मुंबई, दि. १४ : भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची गरज भविष्यात उरणार नाही, कारण आता जागतिक दर्जाची शिक्षणसंस्था भारतात येत आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत पाच प्रमुख आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना आशयपत्र (LOI) प्रदान करण्यात आले असून, यामुळे भारतातच आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेणे शक्य होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.