कोकणात घुमू लागले जाखडी नृत्य व भजनाचे स्वर

रत्नागिरी, दि. ०८ (प्रतिनिधी): गणा धाव रे गणा पाव रे तू आम्हाला नवसाला पाव रे… असं म्हणत गणेशोत्सवात जाखडीच्या ठेक्यावरती कोकणात तालमीचे सूर घुमू लागले आहेत. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात जाखडी नृत्य हे विशेष प्रसिद्ध आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावोगावी गणेशोत्सवात भजन मंडळांची जय्यत तयारी सुरू असून घरोघरी पेटी, पखवाज, टाळ, मृदुंग यांचे सूर घुमू लागले आहेत. लोककला प्रकारातील जाखडी  व भजन या लोककलेच्या माध्यमातून विविध प्रश्नांवरती या माध्यमातून जनप्रबोधन करत प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी या कला माध्यमाचा उपयोग केला जातो.
ढोलकीच्या तालावर पायात घुंगरू बांधून खास जाखडी नृत्याचा वेश परिधान करून डोक्याला मोरपीस लावून लहान मुले ढोलकीच्या तालावर जाखडी नृत्यावर ठेका धरतात. लहान मुले  युवकांच्या बरोबरीने हौशी मोठी मंडळीही यामध्ये सहभागी होतात. लोककला प्रकारातील जाखडी नृत्य हा लोककला प्रकार विशेषतः गणेशोत्सव कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक वाडीवर गावात पाहायला मिळतो दररोज अनेक घरांमधून मंदिरात आमंत्रण असेल त्या कार्यक्रमात हे नृत्य सादर केले जातात. गणेश वंदनेबरोबरच आराध्य दैवतांच्या आख्यायिकाना गाण्यांचा, भजनाचा साज चढवत ही कला सादर केली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भजन परंपरेला प्रत्येक घरात वाडीत आगळे वेगळे महत्त्व आहे. संध्याकाळी चार वाजता सुरू झालेली भजने दुसऱ्या दिवशीची पहाटे पाच वाजेपर्यंत चालतात. मुंबई परळ येथे वास्तव्यास असलेले मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ माणगाव येथील प्रमोद धुरी यांनी यापूर्वी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्नावर भजन सादर केलं. गणेशोत्सवासाठी धुरी कोकणात दाखल झाले आहेत. याबद्दल ते भरभरून बोलतात. कोकणातील भजन, दशावतार परंपरा कायम अबाधित ठेवणाऱ्या कलाकारांबद्दल व कोकणच्या निर्मितीची महती सांगणार भजन धुरीबुवांनी लिहिले आहे श्री वासुदेवानंद सरस्वती टेंभे स्वामी प्रासादिक भजन मंडळाचे धुरी यांनी ‘आघात कीर्ती श्री नारायण.. झाला, परशुराम अवतार… क्रोधाने तो बाण सोडून हटविला सागर तेथे घडला हो कोकण…’ हे भजन यावर्षी लिहिल्याचं त्यांनी………जवळ बोलताना सांगितलं.
गेली चाळीसवर्ष या क्षेत्रात काम करत आतापर्यंत या कलेसाठी असंख्य  गाणी लिहिणारे सादर करणारे दापोली टेटवली येथील शंकर विठ्ठल भारदे सांगतात जाखडी म्हणजेच याला शक्तीवाले तुरेवाले याचच रूप म्हणजे जाखडी. त्यांनी लिहिलेले बापाची वेदना सांगणार गाणं महाराष्ट्रात प्रसिद्ध झालं यावर्षी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची वेदना गणपती बाप्पाला सांगणार ‘यावर्षी येताना तुम्ही गणराया कोकणातील खड्ड्यांच्या रस्त्याने जपून हळूहळू या…’ हे गाणं त्यांनी रचल आहे. जाखडी व भजन हे कोकणातील दोन्ही कला प्रकारांना प्रोत्साहन मिळावं यासाठी कोकणात, मुंबईत व उर्वरित महाराष्ट्रातही स्पर्धा कार्यक्रमाचेही आयोजन केले जातं. या जाखडी कला प्रकारात आता स्त्रियाही ही कला सादर करतात स्त्री म्हणजे देवीचे आदिशक्तीचे रूप म्हणून ती ‘शक्ती’ आणि ‘तुरेवाले’ म्हणजे पुरुष अस त्याचं स्वरूप असल्याचे भारदे यांनी……..जवळ बोलताना सांगितलं.  मुंबईकर गणेशोत्सवाला अगदी न चुकता हजेरी लावतात बॉस ने रजा न दिल्यास प्रसंगी नोकरीवरही पाणी सोडण्याची तयारी असते पण गणपती बाप्पाला आराध्य दैवत कोकण वर्षीय सध्या मुंबईतून घराघरात दाखल होऊ लागले आहेत. आता काही तासांवर आलेल्या गणपती बाप्पाचे स्वागत करण्यासाठी घराघरात संध्याकाळपासून रात्री आरासासाठी जागरण करून आता आरासालाही मूर्त स्वरूप देण्याचे काम सुरू असल्याची माहिती कणकवली येथील गिरीश सावंत यांनी दिली.

आणखी वाचा