रत्नागिरी, ७ ऑगस्ट | प्रतिनिधी : देशभक्तीचा संदेश प्रत्येक घराघरात पोहोचवणारी ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम गेल्या तीन वर्षांत एक लोकचळवळ बनली असून, यंदाही ती अधिक जोमाने राबवावी, असे स्पष्ट निर्देश अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज आयोजित बैठकीत ही सूचना देण्यात आली.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यासह विविध विभागप्रमुख, आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रांताधिकारी, तहसीलदार सहभागी झाले होते.
तीन टप्प्यांतील नियोजन
अपर जिल्हाधिकारी गलांडे यांनी सांगितले की, शासनाने यावर्षी मोहिमेसाठी तीन टप्पे निश्चित केले आहेत –
-
8 ऑगस्टपर्यंतचा पहिला टप्पा
-
9 ते 12 ऑगस्टदरम्यानचा दुसरा टप्पा
-
13 ते 15 ऑगस्टचा तिसरा आणि मुख्य टप्पा









