मुंबई, दि. ०१ (प्रतिनिधी): विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस गदारोळात गेला. राज्यातील शेतकऱ्यांच्या अपमानासंबंधी वादग्रस्त विधानांवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आणि सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आल्यानंतर विरोधकांनी एकजुटीने सभात्याग करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
सकाळी विधानसभेचं कामकाज सुरळीत सुरू असताना प्रश्नोत्तरांच्या सत्रानंतर वातावरण अचानक पेटलं. शेतकऱ्यांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या आमदार बबनराव लोणीकर आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईची










