मणिपूरपासून निघालेली ऐतिहासिक भारत जोडो न्याय यात्रेचा ६७०० किमीचा प्रवास करून मुंबईत चैत्यभूमीवर समारोप

भारत जोडो न्याय यात्रेचे मुंबई जागोजागी जल्लोषात स्वागतउद्या शिवाजी पार्कवर इंडिया आघाडी जाहीर सभा

धारावीच खरी ‘मेक इन इंडिया’धारावीतल्या उद्योगाला पाठिंबा देऊन भारताचे उत्पादन हब बनावे

समाजात जनजागृती करण्यासाठी भारत जोडो न्याय यात्रा: प्रियंका गांधी

मुंबईदि. १६ : मणिपूरपासून निघालेली राहुल गांधी यांची ऐतिहासिक भारत जोडो न्याय यात्रा ६७०० किलोमीटरचे अंतर पार करून मुंबईतील चैत्यभूमीवर समाप्त झाली. यावेळी राहुल गांधी यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले व संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. याआधी सकाळी यात्रा भिवंडीतून सुरु झाली त्यानंतर कळवामुंब्राठाणेभांडूपसायनधारावीतून दादर येथील चैत्यभूमीवर आली. मुंबईत भारत जोडो यात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. उद्या शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची जाहीर सभा होत असून या सभेतून इंडिया आघाडी लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे.

यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस वेणुगोपालप्रियंका गांधीमीडिया विभागाचे प्रभारी जयराम रमेशमहाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलाराजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोतकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेविधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरातविरोधी पक्षनेते 

विजय वडेट्टीवारविधान परिषदेतील गटनेत सतेज बंटी पाटीलमुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाडगोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरेआनंदराज आंबेडकरभीमराव आंबेडकर AICC चे सचिव आशिष दुवासोनल पटेलबी.एम. संदीप, CWC सदस्य व खासदार चंद्रकांत हंडोरेआमदार भाई जगतापमुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणजित सप्राप्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडेसंजय निरुपममुख्य प्रवक्ते अतुल लोंढेडॉ. राजू वाघमारेसचिन सावंतराजन भोसलेआदी उपस्थित होते 

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी धारावीकरांना संबोधित केलेदेशातील सर्व महत्वाच्या कंपन्यासंपत्ती फक्त अदानी व अंबानी यांनाच विकल्या जात आहेत. धारावी तुमची हक्काची जमीन आहे परंतु दलालाच्या माध्यमातून ही जमीनही बळकावली जात आहे. धारावीची जमीन बळाकणाऱ्या अदानीच्या मागे देशाचे पंतप्रधान ईडीसीबीआयआयकर विभाग घेऊन उभे आहेत. धारावी पुनर्वसन प्रकल्प अदानीला देऊन पोलीस बळाचा वापर करुन स्थानिक धारावीकरांना हुसकावले जात आहेअसा आरोप खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. धारावी तुमची आहे व तुमचीच राहिली पाहिजे. धारावीत सर्व प्रकारचे छोट्या छोट्या वस्तुंचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जातेकौशल्याचे काम येथे होत आहेया उद्योगाला पाठिंबा दिला पाहिजेबँकांचे दरवाजे उघडे केले पाहिजेत. धारावी भारताचे उत्पादन हब बनवले पाहिजे कारण धारावीच खऱ्या अर्थाने ‘मेक इन इंडिया’ आहे. देश तुमच्या सारख्यांच्या मेहनतीवर उभा राहतोदलालांमुळे नाही परंतु आज मेहनत तुम्ही करता व पैसा अदानी घेऊन जातो. आज लढाई कौशल्य व दलाल यांच्यात आहेआज लढाई धारावी व अदानी यांच्यात आहे. तुम्हाला लुटले जात आहेजागे व्हाअसे आवाहन राहुल गांधी यांनी 

 

केले.

काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यावेळी म्हणाल्या कीसरकार जनतेपासून वस्तुस्थिती लपवत आहे. देशाची वस्तुस्थिती कळावी व जनतेला जागृत करण्यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा काढली. मागील १० वर्षात महागाईबेरोजगारी कमी झालेली नाही. मोठे इव्हेंट करून काम होत असल्याचे दाखवले जात आहे 

परंतु परिस्थिती तशी नाही. जीएसटी व नोटबंदीने देशातील जनतेचे प्रचंड हाल केले आहेत. अग्निवीरमध्ये भरती होण्यास तरुण तयार नाहीत. ४ वर्षांची लष्करी सेवा करुन काय करायचे अशी स्थिती या तरुणांची झालेली आहे. भाजपा सरकार गरिबांसाठी काम करत नाही ते फक्त धनदांडग्यांसाठी काम करते असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

आणखी वाचा