आमचे तत्व जनतेच्या कामाला महत्त्व : किरण सामंत

साखरपा, दि. १७ (प्रतिनिधी): विधानसभेच्या निवडणुकांची तारीख जशी जवळ येत आहे ,तशा अनेक संघटना मंडळे आपला पाठिंबा कोणत्या ना कोणत्या उमेदवाराला जाहीर करू लागले आहेत ज्या पक्षाचा उमेदवार जनतेच्या कामासाठी उपयोगी येतो त्याच पक्षाला उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर करतात .
राजापूर लांजा साखरपा या विधानसभा मतदार संघातील उमेदवार ज्यांचे तत्व जनतेच्या कामाला महत्त्व ‘असणारे किरण उर्फ भैय्या सामंत यांना बऱ्याच मंडळानी, अंतिम टप्प्यात आपला पाठिंबा जाहीर केला आहे तसेच काही संघटनांनीही आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे राजापूर लांजा साखरपा मतदार संघात किरण सामंत यांचे पारडे जड होऊ लागले आहे.

राजापूर लांजा साखरपा मतदार संघामध्ये किरण सामंत यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी वेगळी प्रचार यंत्रणा राबवली आहे, प्रत्येक घराघरात जाऊन प्रचाराची विविध पद्धत राबवून किरण सामंत यांचा धनुष्यबाण आणि त्यांनी केलेल्या कामांची पत्रक पोचवली आहेत. या मतदारसंघातील भैय्या सामंत यांचे कार्यकर्ते रात्रं दिवस जीवाचं रान करून प्रचार यंत्रणा राबवत आहेत. भैय्या सामंत यांचे विचार आणि काम करण्याची पद्धत घराघरात पोहोचवत आहेत. नी:पक्षपाती काम करण्याची पद्धत जनतेसमोर मांडत आहेत. त्यामुळे मतदार संघातील गोरगरीब सामान्य माणूस धनुष्यबाणाकडे वळला आहे.

या मतदारसंघात धनुष्यबाण नवीन नसून गेल्या 35 वर्षापासून धनुष्यबाण हीच निशाणी या मतदारसंघात मतदारांच्या घरात आणि मनात आहे तर काही ठिकाणी आम्ही बाळासाहेबांनी दिलेल्या धनुष्यबाणाचे मतदार आहोत आणि शेवटपर्यंत धनुष्यबाणावरच शिक्का मारणार असेच म्हणत आहेत.

या मतदारसंघात कलगीतुरा उन्नती मंडळ मुंबई ,पाचल पंचक्रोशी धनगर समाज ,अखिल वारकरी संप्रदाय, कोकणातील बळीराजा सेना पक्ष अशा अनेक मंडळ आणि पक्षाने शिंदे गट शिवसेनेच्या किरण उर्फ भैय्या सामंत यांना जाहीर पाठिंबा दिला आहे .

तसेच जनतेतून भैय्या आमदार म्हणजे मी आमदार’ अशी अनेक स्लोगन सोशल मीडियावर फिरताना दिसत आहे. एकूणच या मतदारसंघात किरण सामंत यांचे पारडे जड झाल्याचे चित्र आहे.

आणखी वाचा